Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»राज्यातील ४,६९० शाळांना टाळे लावण्याच्या हालचाली
    ताज्या बातम्या

    राज्यातील ४,६९० शाळांना टाळे लावण्याच्या हालचाली

    By May 12, 2020No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई :- शिक्षणाची गंगा खेडोपाड्यांत, आदिवासी परिसरात न्यावी म्हणून अनेक योजना आणल्या. परंतु आता  राज्यातील ४६९० शाळांनाही टाळे लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिक्षण विभागाने राज्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या चार हजार ६९० शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्वाधिक सातशे शाळा रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. तर सर्वात कमी म्हणजे २१ शाळा बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, या शाळा बंद होणार अशी भूमिका शासनाने घेतल्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे.

    कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी हा निर्णय घेतल्याचे समजते आहे. कारण शिक्षकांच्या वेतनावर होणारा खर्च, सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेवर होणारा खर्च लक्षात घेता शासनावर कोट्यवधींचा बोजा पडतो. त्यामुळे शासनाने १० पेक्षा कमी पट असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करून या शाळा बंद करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिक्षण सचिवांच्या एका बैठकीत कमी पटसंख्येच्या राज्यात पाच हजार शाळा बंद करण्याचे टार्गेट होते, त्यानुसार राज्यातील तब्बल ४ हजार ६९० शाळांची यादी तयार झाली आहे.

    दरम्यान, कमी पटाच्या शाळा बहुतांश दुर्गम भागात आहेत. या दुर्गम भागात वाहने, रस्ते, शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहातील. त्यामुळे या शाळा शासनाने बंद करु नयेत अशी मागणी शिक्षण समितीचे राज्यध्यक्ष उदय शिंदे, राज्य सचिव विजय कोंबे यांनी शासनाकडे केली आहे.

    दहा पटसंख्येच्या शाळा व जिल्हे

    नगर ९२, अकोला ५५, अमरावती १२१, औरंगाबाद ६२, भंडारा २९, बीड १०२, बुलढाणा-२४, चंद्रपूर- १३३, धुळे- १२, गडचिरोली- ३८४, गोंदिया-६३, हिंगोली- ३०, जळगाव- २१, जालना- २६, कोल्हापूर- १४१, लातूर- ५४, नागपूर- १२८, नांदेड- १३३, नंदुरबार- ३३, नाशिक- ९४, उस्मानाबाद- २७, पालघर- ८८, पुणे- ३७८, रायगड- ५७३, रत्नागिरी-७००, सांगली- ७७, सातारा- ३७०, सिंधुदुर्ग- ४४१,

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026

    पाय घसरुन विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif