राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४९ वर ; दोघे व्हेंटिलेटरवर

0

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४९ वर पोहोचली असून मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयातील दोघे व्हेंटिलेटरवर आहेत. तर इतरांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. प्रत्येकाने काळजी घ्यावी, घरी सुरक्षित रहावं. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. ३१ तारखेपर्यंतचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. फेज २ मधून फेज ३ मध्ये जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबई आणि उल्हासनगरमध्ये करोनाचे आज आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. यापैकी मुंबईतील २२ वर्षीय तरुणी ही ब्रिटनहून आली होती. तर, उल्हासनगरमधील ४९ वर्षीय महिला दुबईहून आली होती. या दोघींनाही आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. १२ तासात चार नवे रुग्ण आढळले आहेत. संसर्ग होण्याचं प्रमाण ५० मध्ये १० आहेत. संसर्ग होऊ नये याची आम्ही दक्षता घेत आहोत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. मुंबईची लोकल बंद करणं हा शेवटचा पर्याय असेल. सध्या १२ देश असे आहेत ज्यातून आलेले रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळत आहेत. या १२ देशांना आपण बंदी घातली आहे असंही राजेेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुंबईतील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच इतर रुग्णांची प्रकृती चांगली आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.