योग, आयुर्वेदाप्रमाणे अग्नीहोत्राला मान्यता मिळावी !

0

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव- योग आणि आयुर्वेदाप्रमाणेच अग्निहोत्र हे सुद्धा एक शास्त्र आहे. आणि त्याला कर्मकांडाशी जोडले जात असल्यामुळे त्याला शासकीय पातळीवर भारतात मान्यता मिळत नाही हे दुर्दैव म्हणता येईल, तथापि भारताव्यतिरिक्त जगातील 70 देशामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार  मोठ्या प्रमाणात होतोय. भारतात अग्निहोत्राला कर्मकांडापासून मुक्त करून सुख शांती आणि आरोग्यासाठी त्याला मान्यता मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अक्कलकोट स्वामी समर्थ केंद्राचे पीठाधीश डॉ पुरुषोत्तम राजीमवाले यांनी लोकशाहीच्या लोकलाइव्ह चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केले.

डॉ पुरषोत्तम होणार्‍या सामूहिक अग्नीहोत्र सोहळ्यानिमित्त  आले होते. त्याच्याच नेतृत्वात जळगावात भव्य सामूहिक अग्निहोत्र  सोहळा पार पडला. सुख शांती आणि आरोग्यासाठी अग्निहोत्राच्या देशभर जगभर प्रचार होणे आवश्यक आहे. 12 मार्च  हा जागतिक अग्निहोत्र दिवस साजरा केला जातो त्यानिमित्त जळगावात सामूहिक अग्निहोत्र सोहळा होय. डॉ पुरुषोत्तम राजीमवाले यांनी अक्कलकोट  स्वामी समर्थ केंद्राविषयी आणि त्याचाच एक भाग असलेल्या अग्निहोत्राविषयी माहीती  देताना पुढे म्हणाले  स्वामी समर्थ हे नाव  भक्तांनी त्यांना श्रद्धेने दिलेले आहे. त्यांचे मुळ  नाव नरसिहंन होते 1857 ते 1878 या 21 वर्षाच्या वास्तव्यात स्वामींनी तपस्या केली त्यांच्या  निर्वाणानंतर बाळप्पा महाराज ,गंगाधर महाराज त्यानंतर गजानन महाराज यांनी त्या गादिचा वारसा चालवला. गजानन महाराजांनी 1944 साली गुरुपीठ स्थापन करून अग्निहोत्र सुरु केले. त्यानंतर श्रीकांतजी महाराजांनि तो वारसा चालवला आता तो वारसा चालविण्याची  संधी मला मिळते आहे असे प्रतिपादन पुरुषोत्तम राजीमवाले यांनी केले.

अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर हे भक्ताचे श्रद्धास्थान  आहे. तेथे अग्निहोत्रासाठी जागा अपुरी पडायची म्हणून त्याचा कार्यविस्तार करून आज शिवपूरीमध्ये 125 एकर परिसरात  अग्निहोत्रावर संशोधन कार्य सुरु आहे. शास्त्रीय पातळीवर त्याचा अभ्यास सुरु आहे जगातील 70 देशात त्याचा प्रसार झालाय  भारतातसुद्धा झपाट्याने  अग्निहोत्राचा प्रचार आणि प्रसार झपाट्याने होतोय आम्ही अंधश्रद्धेच्या विरोधात  आहोत परंतु सकाळी सूर्यादयाच्यावेळी  आणि  सायंकाळी सूर्यास्ताच्यावेळी अग्निहोत्र केल्यानंतर आपल्या जिनवशैलीत परिपूर्णता  साधता  येते मनाच्या कक्षा  रुंदावता येतात काय ?यावर अभ्यास सुरु आहे  परंतु आपल्याला त्यातून कमालीची ऊर्जा मिळते यांचा अनुभव येतोय अनेक अभ्यासकानि त्याचा अभ्यास केला . पृथ्वीवरील ऊर्जा  लहरी प्राप्त होतात हे अग्निहोत्राचे यश आहे.

जळगाव शहर आणि जिल्ह्यात अग्निहोत्राचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय . त्यामुळे  जळगावात सामूहिक अग्निहोत्र सोहळा घेण्यात आला. अग्निहोत्रासाठी लागणारे साहित्य जळगावात अमर चौधरी कांताई नेत्रालय  निमखेडी रोड जळगाव येथे उपलब्ध आहे तेथून ते साहित्य घ्यावे असे आवाहनही डॉ पुरुषोत्तम राजीमवाले यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.