Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मुक्ताईनगर मतदार संघातील धरण ग्रस्त रहिवासी घरांचे अतिक्रमण कायम करणार
    जळगाव

    मुक्ताईनगर मतदार संघातील धरण ग्रस्त रहिवासी घरांचे अतिक्रमण कायम करणार

    By March 18, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर मतदार संघातील प्रकल्प बाधित शहराच्या चहुबाजुला असलेल्या नागरीकांच्या सरकारी जागेवरील रहिवासी घरे कायम करण्यासाठी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपविभागीय अधिकारी भुसावळ आणि तालुक्यातील संबंधित अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.

    या संदर्भात अधिक माहिती अशी की,मुक्ताईनगर हे हतनूर धरणाच्या उभारणी साठी प्रकल्प बाधित तालुक्याचे शहर आहे.शहर आणि तालुका तसेच प्रामुख्याने या विधानसभा मतदारसंघाचे राजकारणात हा अतिक्रमणाचा मुद्दा गेले २५ वर्षां पासून अनेकांना तारुन गेला होता.आता मात्र मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी या पुढे हा मुद्दाच या मतदार संघाचे राजकारणातून कायमचा बाद करण्याचा निश्चय केला आहे.त्यामुळे यापुढे या मतदार संघात अतिक्रमणाचे मुद्दे चघळू पाहणा-यांच्या राजकारणाला पुर्ण विराम मिळणार असल्याचे यावेळी सांगितले.कारण आ.चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथील शासकीय जागेवर रहिवासी निवा-याची घरे बेघर परिवारातल्या लोकांना त्यांच्या नावे कायम करण्यासाठी मुक्ताईनगर चे तहसीलदार शाम वाडकर यांचे कार्यालयात प्रत्यक्ष चर्चा करून संबंधित शासकीय अधिकारी आणि जिल्हा स्तरावरच्या अधिकारी यांच्या सदर बैठकीचे आयोजन दि.१८ मार्चे रोजी केले आहे.या विषयावर विधान सभेच्या अधिवेशनात चर्चेत चुकीची माहिती सभागृहात समोर आल्याचे खात्याचे मंत्री व पीठासीन अधिकारी यांच्या लक्षात आ.पाटील यांनी ही बाब आणून दिली त्यामुळे मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील आणि हतनूर धरणाचे लाभक्षेत्रातील अशा सरकारी जागेवरील सर्व बेघर परिवाराची घरे कायम नावावर लावण्यासाठी आ.पाटील यांनी कंबर कसली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif