Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»मुंबईत दुसऱ्या दिवशीही धोधो पाऊस : रेल्वे, विमानसेवेवर परिणाम
    ताज्या बातम्या

    मुंबईत दुसऱ्या दिवशीही धोधो पाऊस : रेल्वे, विमानसेवेवर परिणाम

    By June 29, 2019No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई: मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे रेल्वे आणि विमान सेवांवर परिणाम झाला असून तिन्ही मार्गावरील लोकल्स १० ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. शुक्रवारी सकाळी सुरु झालेला पाऊस रात्रभर कोसळत होता. पावसाने उसंत घेतलेली नाही. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. तर अंबरनाथ येथे रिक्षा स्टँडवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.

    दरम्यान, या पावसामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि त्याचदिवशी मुंबईहून पुन्हा पुण्याला येणाऱ्या प्रगती एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस आणि पनवेल पॅसेंजर या गाड्या २९ आणि ३० जूनला रद्द करण्यात आल्या आहे. भुसावळ-पुणे-भुसावळ ही एक्स्प्रेस दौंड आणि मनमाडमार्गे सोडण्यात येणार आहे अशीही माहिती मिळाली आहे. दरम्यान मुंबईतली लोकल वाहतूही उशिराने सुरू आहे. दरम्यान, येत्या २४ तासात मुसळधार पाऊस कोसळ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकण, मुंबई, रायगड आणि पालघर, पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

    #Maharashtra: Rain showers continue to lash #Mumbai pic.twitter.com/ykaLtgX4ho

    — ANI (@ANI) 29 June 2019

    राज्यात मान्सूनला चांगली सुरुवात झाली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरताच राज्याच्या पश्चिम भागात मान्सून सक्रिय झाला. मुंबईत रात्रभर अधूनमधून मुसळधार पाऊस पडत होता. मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी दिवसभर संततधार पाऊस कोसळत होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif