Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»मुंबईकरांना दिलासा, मार्चनंतर प्रथमच सर्वात कमी मृत्यूची नोंद
    ताज्या बातम्या

    मुंबईकरांना दिलासा, मार्चनंतर प्रथमच सर्वात कमी मृत्यूची नोंद

    By January 4, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकड्यातही दिवसेंदिवस घट होताना पाहायला मिळत आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा हा नियंत्रणात येताना दिसत आहे.

     

    राज्यात  (3 जानेवारी) 3 हजार 282 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 35 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईत आज फक्त 581 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर केवळ 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

     

    मार्च-एप्रिल या कोरोनाच्या महिन्यानंतर मुंबईत प्रथमच सर्वात कमी मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

     

    दरम्यान मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. झोपडपट्टयांतील कंटेन्मेंट झोनची आणि सीलबंद इमारतीची संख्येतही घट होत आहे. कोरोनासंदर्भातील शनिवार (2 जानेवारी) आणि आज (3 जानेवारी) अशा दोन दिवसांचा तुलनात्मक अभ्यास केला असता, झोपडपट्टया आणि चाळीतील कंटेन्मेंट झोनची संख्या 283 वरून 221 एवढी झाली आहे.

     

    याचा अर्थ झोपडपट्टया आणि चाळीतील कंटेन्मेंट झोनच्या संख्येत 62 ने घट झाली आहे. तर सीलबंद इमारतीची संख्या 2,462 वरून 2090 एवढी झाली आहे. म्हणजेच त्यामध्ये 373 ने घट झाली आहे.

     

    तसेच, कोरोनामुळे शनिवार (2 जानेवारी) 7 जणांचा मृत्यू झाला होता. तर आजच्या अहवालात केवळ 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत 4 ने घट झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 132 वरून 11,135 एवढी झाली आहे.

     

    त्याशिवाय काल कोरोनाच्या चाचण्यांची संख्या 23 लाख 82 हजार 420 एवढी होती. तर दिवसभरातील 11,170 चाचण्यांची भर पडली आहे. आता एकूण चाचण्यांची संख्या 24 लाख 93 हजार 590 एवढी झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    ढगांच्या ‌‘ऑफलाइन‌’ मोडमुळे शेतात सायलेंट मोड!

    July 14, 2026

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    July 14, 2026

    11 पुनर्वसित गावांच्या मालमत्ता नोंदींचा प्रश्न मार्गी!

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif