मुंबई: शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विनायक राऊत, आझमी, केसी. पडवी आणि जयंत पाटील आदी नेते आज सकाळी १० वाजताच्या सुमारास राजभवनात जाऊन राज्यपालांकडे १६४ आमदारांच्या सह्यांचं पत्र दिलं आहे. भाजपा बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यानंतर सत्तास्थापनेसाठी आम्हाला संधी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आज सकाळी राजभवन येते @ShivSena @NCPspeaks व @INCMaharashtra या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल @BSKoshyari यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी या तिन्ही पक्षांना निमंत्रित करावे या विनंतीसाठी त्यांना विनंतीपत्र देण्यात आले. pic.twitter.com/cvatmslojt
— NCP (@NCPspeaks) November 25, 2019
.@Dev_Fadnavis हे बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत. त्यांच्या असमर्थतेनंतर @ShivSena @NCPspeaks @INCMaharashtra तसेच सहयोगी पक्षांना सरकार स्थापनेसाठी तात्काळ पाचारण करावे यासाठी हे पत्र असून पूर्ण बहुमतदर्शक संख्याबळाच्या विधानसभा सदस्यांच्या सह्या या पत्रावर आहेत. pic.twitter.com/n8anE8CTJ4
— NCP (@NCPspeaks) November 25, 2019
“आज आम्ही राज्यपालांना विधानसभेतील १६२ आमदारांच्या सह्या असणारं पत्र राज्यापलांना दिलं आहे. संख्याबळ नव्हतं असं सांगत भाजपाने असमर्थता दर्शवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्याकडे आजही पुरेसं संख्याबळ नसल्याने बहूमत सिद्ध करु शकणारच नाही. भाजपा असमर्थ ठरल्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच घटकपक्षांना सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी,” असं यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलं.
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर सहकारी पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या सह्यांची यादी या पत्रासोबत जोडत आहोत. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळं आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी तात्काळ निमंत्रित करण्यात यावं, अशीही मागणी या पत्राद्वारे केली आहे.
Comments are closed.