नवी दिल्ली : शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार असं वाटत असतानाच शनिवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ राजकीय वर्तुळात भूकंप झाला.
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे पडसाद आज लोकसभेतही उमटले. काँग्रेस नेते संसदेच्या बाहेर भाजपविरोधात धरणे आंदोलन करत आहेत. या आंदोलनात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, अहमद पटेल, आनंद शर्मा आणि रंजन चौधरी यांच्यासमवेत अनेक बडे नेते उपस्थित आहेत.
Delhi: Congress Interim President Sonia Gandhi leads party's protest in Parliament premises over Maharashtra government formation issue. pic.twitter.com/B98L3uHqq0
— ANI (@ANI) November 25, 2019
यावेळी काँग्रेस नेत्यांच्या हातात भाजपविरोधात पोस्टर्स असून त्यावर लोकशाहीची हत्या बंद करा, अबकी बार बेईमानीची सरकार नाही चालणार, असे लिहिण्यात आले आहेत.दरम्यान, भाजप आणि अजित पवार यांनी राज्यघटनेची खिल्ली उडवली आहे. देवेंद्र फडणवीसांनी तातडीने राजीनामा द्यावा. विश्वासदर्शक ठरावावेळी सत्य सर्वांच्या समोर येईलच, असे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले आहे.