मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
पुढचे १५ ते २० दिवस अत्यंत -महत्वाचे असून कोरोनाचा संसर्ग टाळणे महत्वाचे आहे. काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या, असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
देशात करोनाचे आतापर्यंत १९५ रुग्ण आढळले आहेत. त्यात ३२ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ पर्यंत पोहोचली आहे. तर करोनामुळे आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.