जळगाव – रविवारी २२ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरी च्या रथ चौक जळगाव येथील कार्यालयात झालेल्या तडजोड समितीच्या माध्यमाने मध्यप्रदेश येथील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील नेपानगर तालुक्यातील निमना या गावातील एजाज शेख ला जळगाव येथील आफ्रीनला रवाना करण्यात बिरादरी ला यश प्राप्त झाले. दोघांमध्ये किरकोळ स्वरूपाचे गैरसमज असल्याने ते दूर करून त्यांचे लेखी आपसातील समझोता करारनामा करण्यात येऊन त्यांना संसारी बऱ्हाणपूर येथे रवाना करण्यात आले.

तीन महिन्याची माहेराला मिळाला पितृछत्र
१९नोव्हेंबर २०१९ ला शिरसोली येथील तरुणाचे विवाह खेडी कढोली येथील तरुणी सोबत झालेले होते.
तीन महिन्यापूर्वी त्यांना माहेरा ही कन्यारत्न प्राप्त झाले परंतु डिलिव्हरीला जाताना दोघा पती-पत्नीमध्ये आपल्या आई-वडिलांच्या जिद्दी स्वभावा मुळे वाद निर्माण झाले होते त्यामुळे मुस्कान की माहेरी राहत होती व पिता हा माहेरा ला सुध्दा भेटू शकत नसल्याने सदर बाब बिरादरी च्या निदर्शनास आणताच दोघी कुटुंबियांना बोलून चर्चा करून दोघांमध्ये व खास करून त्यांच्या पालकांमधील गैरसमज काढून दोघांचे वैवाहिक जीवन कसे आनंदी होईल यासाठी बिरादरी ने आदर्श आचार संहिता तयार करून त्यांच्यावर त्या दोघा विवाहितांचे व पालकांचे स्वाक्षऱ्या घेऊन त्यांना रवाना करण्यात आले.
अशाप्रकारे बिरादरी च्या रविवारी झालेल्या बैठकीत दोन वैवाहिक वाद संपुष्टात येऊन त्यांना सासरी रवाना करण्यात आले तर बिरादरी च्या कार्यालयातच एक विवाह सोहळा न भूतो न भविष्यती असा साकारण्यात आला.
अशा प्रकारे ३ जोडपी आज आपल्या वैवाहिक जीवनाची पुनश्च सुरवात करीत आहेत.
तडजोड साठी यांनी घेतले परिश्रम
मानियार बिरादरी च्या तडजोड समिती मध्ये रविवारी झालेल्या सभेत बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, तडजोड समितीचे अध्यक्ष सय्यद चाँद, सदस्य इक्बाल वजीर, सादिक शेख मुसा, अलताफ शेख उपस्थित होते तर मोहसिन युसुफ ,अख्तर शेख व जूलकर नैन यांनी सहकार्य केले.
