मंत्रालयात सर्वसामान्य व्यक्तींना प्रवेश बंद ; राज्य सरकारचा निर्णय

0

मुंबई : देशभरातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानी आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.  राज्य सरकारने मंत्रालयात सामन्यांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

विविध कामाच्या निमत्ताने राज्यभरातील लोकं मंत्रालयात येत असतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता, राज्यसरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयात येणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना 31 मार्चपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मंत्री, अधिकारी आणि कर्मचार्यांनाच आता मंत्रालयात जाता येणार आहे.

दरम्यान, कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.  राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 37 वर गेली आहे. तर टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे 16, मुंबई 8, ठाणे 1, कल्याण 1, नवी मुंबई 2, पनवेल 1, नागपूर 4, अहमदनगर 1 , यवतमाळ 2, औरंगाबाद 1 अशी रुग्णांची संख्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.