भुसावळ: गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज पुन्हा सकाळपासून हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे.
मुळधार पर्जन्यवृष्टीने तालुक्यात रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी पडलेल्या धुव्वाँधार पावसाने बस स्थानक परिसर पाण्याखाली गेला. जामनेर मार्गावर पांडुरंग टाँकिज येथील रस्ताही जलमय झाल्याने रस्ता उखडला. मुसळधार पावसाने रस्त्यांबरोबरच शेतीही पाण्याने भिजली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.