Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भुसावळात विस्थापितांचे पुनर्वसनासाठी आंदोलन !
    जळगाव

    भुसावळात विस्थापितांचे पुनर्वसनासाठी आंदोलन !

    By February 17, 2020No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    घरासमोरिल खड्ड्यात उभे राहून ; मेंणबत्ती लावून श्रद्धांजली वाहिली

    भुसावळ  (प्रतिनिधी) :- येथील राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी शहरातील दीनदयाल नगरातील ९९ घरांचे अतिक्रमण महिनाभरापूर्वी पाडण्यात आले. मात्र अद्यापही शासनकडून विस्थापितांची दखल व पुर्नवसन करण्यात आले नाही. यामुळे विस्तापित नागरिकांनी दि.१६ रोजी रात्री आपापल्या तत्कालिन  घरासमोरिल खड्ड्यात उभे राहून मेंणबत्ती लावून  घरांना श्रद्धांजली अर्पण केली.

    शहरातील महामार्ग विस्तारीकरणाचे काम जोरात सुरू आहे. यात १६ जानेवारी रोजी महामार्गालगतच्या दीनदयाल नगरातील ९९ घरांवर शासनाकडून हातोडा मारण्यात आला. मात्र महिना उलटूनही विस्थापितांची दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. यामुळे नागरिकांनी दि. १६ रोजी एकत्र येत आपापल्या घरांसमोर मेणबत्ती लावून घरांना श्रद्धांजली अर्पण केली. शासनाकडून जोपर्यंत पुर्नवसन होत नाही तोपर्यंत दर महिन्याच्या १६ तारखेला वेगवेगळ्या प्रकारचे दोन तासांचे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे लोकसंघर्ष मोर्चाचे चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले.

    तत्कालीन न. पा. प्रशासनाने आठवडे बाजारासाठी विस्थापित केलेल्यांसाठी दीनदयाल नगरची उभारणी केली होती. आता हायवेमध्ये त्याच विस्थापितांना स्वत:चा ७/१२ मिळून देण्याची प्रक्रिया शासनाने राबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी चंद्रकांत चौधरी, किरण मिस्तरी, आरती जोहरी, राजकुमार ठाकूर, संपत मेढे, निर्मला सुरवाडे, विजया मिस्तरी, सीमा चौधरी, अॅड. विजय तायडे, श्रीराम पाटील, सूरज वराडे, प्रकाश खडके, ज्योती खडके यांच्यासह विस्तापीत घरमालकांपैकी ८० घरमालक उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif