भाजप अध्यक्ष उदय वाघ यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा – आ. एकनाथराव खडसे

0

 

जळगाव प्रतिनिधी – भारतीय जनता पक्ष हा नितीमत्तेवर चालणारा पक्ष आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून जळगाव जिल्हा भाजप अध्यक्ष उदय वाघ यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा अशी मागणी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे

भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी अमली पदार्थाचा धंदा करणाऱ्या व्यापाराला संरक्षण देण्यसाठी त्याचे कडून १० लाख रु. घेतले या बाबत पत्रकारांनी विचारले असता एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की धंदा करणाऱ्या एवढाच त्या धंद्याला चालना देणारा तेवढाच जाबदार आहे. त्यातील सत्यता बाहेर आली पाहिजे एखाद्या सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष अशा प्रकारचे उद्योग करीत असेल तर भाजपसाठी हे योग्य नाही. माझ्यावर साधा आरोप झाला तर मला राजीनामा द्यावा लागला इथे तर पुरावे आहेत त्याची छानबिन होऊन चौकशी झाली पाहिजे असेही खडसे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.