प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
भडगाव ;- तालुक्यातील रोकडा फार्म कडील रस्त्यावरील नाल्यावर असलेल्या नालाबांध काॅक्रींटच्या खालून फुटल्याने पावसाचे पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रोकडा फार्म रस्त्यावर दोन वर्षापुर्वी नाल्यावर सिमेंट बंधारा बांधण्यात आला. दोन दिवसापुर्वी वडजी परीसरात मोठ्याप्रमाणात पाऊस बरसला. त्यामुळे नाल्याला पुर आला. त्यात सिमेंट बांधाच्या एका बाजुला खालून पाणी निघुन गेले. त्यामुळे पावसाचे पाणीच या बांधामधे अडले नाही. त्यामुळे परीसरातील शेतकर्यानी निराश झाले आहे. याबांधामुळे परीसरातील विहीरीच्या पाणी पातळी वाढण्यास मोठा हातभार लागत असतो. मात्र बांधातुन पाणी झिरपल्याने विहीरीनां याचा फटका बसणार आहे. दरम्यान दोनच वर्षापुर्वी बांधलेला बंधार्या एका बाजुकडुन कशी काय गळती लागली? याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या बंधार्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.