मुंबई– प्लास्टिक बंदीला स्थगिती देण्याची मागणी याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. उद्यापासून (23 जून) मुंबईसह राज्यात प्लास्टिक बंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या नेतृत्त्वात पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची मंत्रालयात आढावा बैठक सुरु झाली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बैठकीला उपस्थित होते .
5 हजारांचा दंड
तुमच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिसल्यास तुम्हाला तब्बल 5 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. पुर्नवापर होऊ शकत नाही, असे प्लास्टिक वापरणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. राज्यात उद्या म्हणजेच 23 जूनपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी लागू होणार आहे.बंदी असलेले प्लास्टिक दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे आढळल्यास त्यांना 5 ते 20 हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post