चिनावल ( वार्ताहर) : चिनावल तसेच खिरोदा महसूल मंडळातील गावांमध्ये बिनशेती झालेल्या प्लाटी धारक सुमारे ९२ थकबाकीदारांना त्यांच्याकडे असलेल्या मागील अनेक वर्षापासून ज्या थकबाकीमुळे वारंवार नोटीस व थकबाकी राखण्याची मागणी करूनही हे प्लॉट धारक भरत नसल्याने तहसीलदार उषा राणी देवगुणे यांनी सदर जमीन सरकार जमा करण्याचे आदेश दिले असून याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे.
खिरोदा महसूल मंडळातील चिनावल व इतर गावातील बिनशेती धारकांकडे बाकी आहेबाकी वसुलीसाठी कारवाई अंतिम टप्प्यात आहे मंडळाचे मंडळाधिकारी संदीप जयस्वाल उमेश बाभुळकर अजय महाजन व त्यांचे सहकारी हे बाकी वसुलीसाठी प्रयत्नशील आहेत. तरीही मंडळातील 92 थकबाकीदार बाकी भरत नसल्याने सदर थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश तहसिलदारांना दिले आहे. याबाबतचे नोटीस संबंधितांना देण्यात आले असून चीनावल येथील एका थकबाकीदारांचे मालमत्तेवर त्याचे नाव कमी करून सरकारचे नाव लागणे बाबतची कारवाई सुरू करण्यात आली आहे. याबाबत मंडळाधिकारी संदीप जयस्वाल व तलाठी अजूनही वसुलीसाठी प्रयत्नशील आहे.