जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्हा परिषदेतील शालेय पोषण आहार योजनेच्या चौकशीमध्ये ठेकेदाराला बिलापेक्षा तब्बल १ लाख ६७ हजार रुपये जास्त दिल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १४ जणांची वेतनवाढ रोखली आहे. यामध्ये पाच अधिकार्यांसह नऊ मुख्याध्यापकांचा समावेश आहे.
चौकशीसाठी समिती गठीत
जिल्हा परिषदेतेच्या शालेय पोषण आहार योजनेतील घोटाळा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उघडकीस आणला होता. त्यांनी शालेय पोषण आहार योजनेतील उघड गैरव्यवहार शोधण्यासाठी चार तालुक्यातील पोषण आहार योजनेची चौकशी केली होती. सन २०१७ या एका वर्षात जळगाव, चाळीसगाव, भडगाव, मुक्ताईनगर या चार तालुक्यातील पोषण आहार योजनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती.
सदर समितीने अहवाल सादर केला तोपर्यंत सीईओ दिवेगावकर यांची बदली झाली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्यास प्रशासनाकडून चालढकल केली जात होती. कारवाईचा दबाव वाढल्याने वारंवार अहवाल बदल करून ठेकेदाराकडून अतिप्रदान रक्कम परत घेण्यात आली होती. या चौकशीमध्ये शिक्षण विभागाने वस्तुनिष्ठ अहवाल २० मे २०१९ रोजी सादर केला होता. मात्र यात दोषी आढळून आलेल्यांवर कारवाई करण्यात आली नव्हती.
यांच्यावर कारवाई
या प्रकरणाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गती दिली. यातूनच दोषी असलेल्या तत्कालीन ५ गटशिक्षणाधिकारी व ९ तत्कालीन मुख्याध्यापकांवर एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झालेल्यांमध्ये जे.डी. पाटील (तत्कालीन विस्तार अधिकारी, मुक्ताईनगर), एस.पी. विभांडिक (विस्तार अधिकारी, चाळीसगाव), आर.व्ही. बिर्हाडे (विस्तार अधिकारी, जळगाव), कल्पना चव्हाण (गटशिक्षणाधिकारी, जळगाव) या पाच अधिकार्यांचा समावेश आहे.
तसेच सुलोचना साळुंके (ग्रेडेड मुख्याध्यापक, गिरड, ता. भडगाव), सुनंदा महाजन (मुख्याध्यापक, चांगदेव, ता. मुक्ताईनगर), सुरेश सुरवाडे (मुख्याध्यापक, चिंचोळ, ता. मुक्ताईनगर), सुपडू हेरोळे (नांदवेल, मुक्ताईनगर), जबीउल्ला शाह अताउल्ला शाह (मुख्याध्यापक, उर्दू शाळा, वढोदा, मुक्ताईनगर), राजेंद्र अडावदकर (मुख्याध्यापक, मांदुर्णे, ता.चाळीसगाव), मिलिंद कोल्हे (मुख्याध्यापक, रायपूर, ता. जळगाव), नाहिदा अंजुम शेख सलीम (मुख्याध्यापक), निहकत अंजुम नाजिमोद्दीन (मुख्याध्यापक) या तत्कालीन मुख्याध्यापकांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.