जम्मू – भाजप आणि पीडीपी या पक्षांनी केवळ सत्तेत राहण्यासाठी केलेली युती अपवित्र होती. परिणामी जनहिताचा बळी गेला. त्यामुळे त्या दोन्ही पक्षांनी जम्मू-काश्मीरच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते देवेंदरसिंह राणा यांनी केली आहे.
विकास, प्रशासन, सुरक्षा अशा सर्वच आघाड्यांवर भाजप आणि पीडीपीने जनतेच्या व्यापक हितांपेक्षा वैयक्तिक हितांना महत्व दिले, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. भाजप-पीडीपी युतीचा प्रयोग अयशस्वी ठरला. त्यामुळे संसदीय लोकशाहीवर जनतेचा विश्वास पुन्हा वाढीस लावण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मात्र, मागील सरकारच्या विभाजनवादी राजकारणामुळे झालेले नुकसान भरून काढण्याची क्षमता केवळ जातीय सलोखा आणि ऐक्यावर विश्वास असणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्समध्येच आहे, असेही त्यांनी म्हटले.