धरणगाव :- धरणगाव तालुक्यातील पीएम किसान योजनेत सर्व शेतकरी पात्र असल्याचे मत धरणगाव येथील तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी ”दै लोकशाहीशी” बोलताना सांगितले.
एकीकडे शासनाच्या योजनेचा बोजवारा होत असताना धरणगाव येथील कार्यक्षम व तत्पर तहसीलदार म्हणून मिलिंद कुलथे यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून शेतकऱ्यांना पि एम किसान योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी कटिबद्ध आहे. एकीकडे पी एम किसान योजनेचा लाभ मिळल्यासाठी शेतकरी अदोलन करत आहे मात्र धरणगाव तालुक्यातील तहसीलदार मिलिंद कुलथे यांचा कार्याचा गौरव होत असून शेतकरी हिताचा निर्णय घेल्यामुळे त्याचे शेतकरी आभार व्यक्त करत आहे.
धरणगाव तालुक्यातील एकूण १९५२०शेतकऱ्याचे बँक अकाउंट लिक झाले असून अजून ३५०० शेतकऱ्याचे बँक अकाउंट लिक होण्याचे बाकी असून शेतकऱ्यांनी आपले पासबुक लिक करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे तसेच शासनाच्या नवीन जी आर नुसार कुटुंबातील सदस्य चे बँक पासबुक असल्यास योजनेचा लाभ मिळेल.
-मिलिंद कुलथे, तहसीलदार