Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पाचोऱ्यात १० मे ते 17 मे पर्यंत जनता कर्फ्यू !
    जळगाव

    पाचोऱ्यात १० मे ते 17 मे पर्यंत जनता कर्फ्यू !

    By May 10, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव (प्रतिनिधी) :– पाचोरा शहरात कोरोना च्या रूग्ण संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या दि 10 मे रोजी पासून ते 17 मे तारखेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. पाचोरा शहरापर्यंत आलेला कोरानाचा प्रादुर्भाव भडगावात येऊ नये याकरिता सतर्कता म्हणुन शहरवासीयांनी 17 तारखेपर्यंत जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन भडगावातील  नागरिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत आज दि 9 रोजी सायंकाळी 4 वाजता तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी अत्यावश्यक सेवा दूध व मेडिकल वगळता सर्व दुकाने दि 10 ते 17 तारखेपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

    बैठकीत तहसीलदार माधुरी आंधळे , पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, काँग्रेस चे जेष्ठ नेते प्रदीप पवार , माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, शशिकांत येवले, गणेश परदेशी, ज्येष्ठ पत्रकार शिवदास आप्पा महाजन  मास्टर लाईन कंपनी चे डायरेक्ट समीर जैन, राष्ट्रवादीचे सुरेंद्र मोरे, योजनाताई पाटील, मीना बाग, सेनेचे इम्रान अली भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, प्रकाश भंडारी, अनिल वाघ, प्रहार जनशक्ती चे विजय भोसले, याकूब पठाण, रातीलाल महाजन,

    पोलीस कर्मचारी लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, तलाठी राहुल पवार, नितीन पाटील, विकास तोतला, यासह किराणा, दूध डेअरी, हातमाल विक्रीदार उपस्थित होते. यावेळी तहसीलदार माधुरी आंधळे यांनी   आपणच आपले रक्षण बनून काम करायचे आवाहन यावेळी त्यांनी केली , शिवाय जनता कर्फ्यु म्हणून मेडिकल व दूध वगळता 17 तारखेपर्यंत बंद पाळण्याचे व प्रशासनाला घरी थांबून मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी कोरोना युद्धात शहीद झालेल्यांना सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली. दरम्यान अनेक मान्यवरांनी सतर्कता म्हणून आपले मत मांडले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif