पाऊले चालती पंढरीची वाट…!

0

तुळशी बागेतून संत सखाराम महाराज पंढरपूर पायी वारीचे प्रस्थान

टाळमृदूंगाच्या गजरात वारकरी तल्लीन ; वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी

अमळनेर;- टाळ,मृदंगाचा गजर करत आज हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने संत सखाराम महाराज आणि विठू नामाचा जयघोष करीत अमळनेर येथील संत सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थानच्या पायी वारीचे आज दि २९ रोजी संत प्रसाद महाराज यांचे प्रमूख मार्गदर्शनाखाली दू १२ वाजता पैलाड येथील तूळशीबागेतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. वारक:यांना निरोप देण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती .


पायी वारीत सहभागी होण्यासाठी वारक:यांची सकाळपासूनच वाडी व तुळशीबागेत गर्दी झाली होती. सकाळपासून या परिसरात टाळ-मृदुंगाचा गजर निनादत होता. सकाळी वाडी संस्थानातून गादीपती प्रसाद महाराज पैलाडमधील वाडी संस्थानच्या तुळशीबागेत आले. याठिकाणी त्यांच्याहस्ते विठ्ठलाच्या मूर्तीला तुळशीपत्र अर्पण करण्यात आले.

असा आहे दिंडीचा मार्ग
पूजा झाल्यानंतर प्रसाद महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. ओसरीवर बसून प्रसाद महाराज भाविकांना खडीसाखरेचा प्रसाद व आशीर्वाद दिले. वाडी संस्थान मध्ये प्रसाद महाराजांची निघणाऱ्या पायी वारीत सूमारे ३०० वारकरी सहभागी झाले आहेत .दिंडीचा पहिला मूक्काम पारोळ्याला  असून तेथून आडगांव ,भडगांव, नगरदेवळा, नेरी ,नागद ,बिलखेडा ,नागापूर ,पिशोर, चिखलठाण ,टाकळी ,दौलताबाद ,वाळूंज ,महारूळ, पैठण, शेवगांव ,पाथर्डी, धामणगांव, कडा ,आष्टी, अरणगांव, जवळा ,करमाळा, निंभोरा, वडशिवणे, सापटणे ,करकंब मार्गे दि.२२जूलै ला पंढरपूरात दाखल होईल . सुमारे २०० वर्षापासूनची परंपरा कायम सूरू असून संस्थानचे अकरावे गाधीपती प्रसाद महाराज यांचे अखंडीत ३१ वे वर्ष आहे चार महीन्यांचा चातूर्मासातील मूक्काम आता महाराजांचा पंढरपूरात राहील.दरम्यान वारकऱ्यायांचे व दिंडीचे नियोजना साठी येवले आप्पा दिलीप जोशी भांडारकर अनिल भालेराव ऊदय देशपांडे आबा नेरकर, हरिभाऊ चौधरी यांचेसह संस्थानचे सेवेकरींचे सहकार्य लाभत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.