जळगाव;- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मार्च/एप्रिल महिन्यात झालेल्या परीक्षांचे निकाल मुदतीच्या आत लावण्याची परंपरा यंदाही कायम ठेवून अग्रेसर राहण्याचा मान प्राप्त केला आहे.
मार्च/एप्रिल/मे, 2018 मध्ये एकूण 851 परीक्षा घेण्यात आल्या. त्यापौकी 624 परीक्षांचे निकाल 30 दिवसांच्या आत जाहीर करण्यात आले. उर्वरित 227 परीक्षांचे निकाल देखील तयार होत असून तीस दिवसांच्या आतच हे निकालही जाहीर होणार आहेत. यातील काही परीक्षा मे/जून पर्यंत सुरु होत्या.
कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी प्रारंभापासूनच सर्व परीक्षांचे निकाल 30 ते 45 दिवसांच्या आत लावले जावेत यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. गतवर्षी सर्व निकाल मुदतीच्या आत जाहीर करण्यात आले. यावर्षी देखील हीच परंपरा कायम राखण्यात विद्यापीठाला यश आले. त्यामुळे यंदा देखील मुदतीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करणारा उमवि प्ॉटर्न कायम राहिला आहे. यंदा विविध विद्याशाखांच्या एकूण 851 परीक्षा घेण्यात आल्या. मार्च/एप्रिल महिन्यात झालेल्या परीक्षांपौकी 624 परीक्षांचे निकाल तीस दिवसांच्या आत जाहीर झाले. यावर्षी प्रथमच बी.ए/बी.कॉम./बी.एस्सी. या पदवी परीक्षेचे निकाल मे महिन्यातच जाहीर झाले. त्यामुळे पदवीच्या विद्याथ्र्यांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण झाले.
यावर्षी सर्व विद्याशाखांच्या परीक्षांकरिता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्याथ्र्यांना फोटोकॉपी, व्हेरीफिकेशन/रिड्रेसलचे अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. यापूर्वी महाविद्यालयांकडे अर्ज सादर करावे लागत व महाविद्यालयांकडून एकत्रितपणे ते अर्ज विद्यापीठाकडे सादर केले जात असत. ऑनलाईन सुविधेमुळे विद्याथ्र्यांच्या वेळेची बचत झाली. अर्ज केल्यानंतर आजपर्यंत 5 हजार 500 विद्याथ्र्यांना ऑनलाईन फोटोकॉपी देण्यात आल्या आहेत. बी.एस्सीच्या 2 हजार 500 विद्याथ्र्यांनी रिडे्रसलसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यातील बहुतांश विद्याथ्र्यांचा निकाल उद्या पर्यंत जाहीर होत असल्यामुळे या विद्याथ्र्यांना एम.एस्सी.च्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. एम.एस्सी प्रवेशासाठी निर्धारित मुदतीच्या आत विद्याथ्र्यांना अर्ज करता यावे यासाठी बी.एस्सीच्या रिड्रेसलसाठी अर्ज केलेल्या विद्याथ्र्यांचा तातडीने निकाल लावण्यात येत आहे.
यंदा विविध विद्याशाखांच्या झालेल्या परीक्षांच्या 5 लाख 25 हजार उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करुन 19 केंद्रावर या उत्तरपत्रिकांचे ऑनस्क्रिन मूल्यमापन करण्यात आले. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.ए.बी.चौधरी यांच्या सहकार्याने तीनही जिल्हयात 19 केंद्रांवर हे मूल्यमापन झाले. मूल्यांकनाच्या या कामासाठी सर्व प्राध्यापकांचे विद्यापीठाला चांगले सहकार्य लाभले. परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचाज्यांनी देखील निकाल मुदतीच्या आत जाहीर करण्यासाठी परिश्रम घेतले.