Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»नितेश राणेंना फडणवीस तुरूंगात टाकणार होते, पण…; शिवसेना खासदाराचा मोठा गौप्यस्फोट
    राजकारण

    नितेश राणेंना फडणवीस तुरूंगात टाकणार होते, पण…; शिवसेना खासदाराचा मोठा गौप्यस्फोट

    By January 11, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कणकवली – एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा भाजप आमदार नितेश राणे यांनी घातला होता, या गुन्ह्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना तुरुंगात टाकणार होते, पण भाजपला नारायण राणे शरण गेल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस या गुन्ह्यात नितेश राणेंना तुरुंगातही टाकणार असल्याचा दावाही विनायक राऊत यांनी केला आहे.

    आवाजाचा वापर करून घरबसल्या कमाईची ११ माध्यमे

    शिवसेना आणि राणे कुटुंबातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. सातत्याने दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना बघायला मिळतात. त्यातच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आता नितेश राणे यांच्याबद्दल खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. विनायक राऊत कणकवलीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, नवी मुंबईतील एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा नितेश राणेंनी घातला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. फडणवीस हे नितेश राणेंना या प्रकरणी तुरुंगात टाकणार होते. पण भाजपला नारायण राणे शरण गेल्या ते प्रकरणी थांबले. जर आम्ही आता मनात आणले, तर ते प्रकरण एका दिवसात उघड करु शकतो आणि ते प्रकरण उघड झाले, तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा राऊत यांनी दिला आहे.

    फडणवीस यांनी अखेरपर्यंत नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजला परवानगी दिली नाही म्हणून दोन महिन्यांपूर्वी राणे मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे अखेर परवानगी दिल्याचा दावा राऊत यांनी केला. उद्धव ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून टीका करा, असा राजकीय सल्ला राऊत यांनी नारायण राणे यांना दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    बंडाची तलवार म्यान?

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif