नको त्या मागण्या वाढत होत्या,म्हणून हा निर्णय घेतला : अजित पवार

0

मुंबई : तीन पक्षाची आघाडी करण्याच्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धक्का दिला. नको त्या गोष्टींच्या मागण्या वाढत होत्या. असंच सुरू झालं तर स्थिर सरकार कसं मिळणार हा माझ्यापुढे होता. म्हणून मी हा निर्णय घेतला,’ असं अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्रातल्या राजकारणाने आज पहाटे अचानक एक वेगळंच वळण घेतलं आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाविकास आघाडीचे सरकार प्रत्यक्षात येत असल्याचे दिसत असतानाच अजित पवार यांचा गड भाजपाला जाऊन मिळाला आणि रात्रीतून सत्तास्थापनेचे सारे चित्रच पालटले.यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. आता राज्याला स्थिर सरकारची गरज असल्याचे सांगत अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.