Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»दोन जुळ्या भावांच्या हत्त्येने मध्यप्रदेश हादरलं
    गुन्हे वार्ता

    दोन जुळ्या भावांच्या हत्त्येने मध्यप्रदेश हादरलं

    By February 25, 2019No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भोपाळ :- मध्य प्रदेशातील चित्रकूट येथून अपहरण करण्यात आलेल्या ५ वर्षांच्या दोन जुळ्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेची बातमी मिळताच मध्यप्रदेश हादरले असून यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. देवांश आणि प्रियांश अशी या जुळ्या भावांची नावे आहेत. चिमुरड्यांचा मृतदेह सापडला तेव्हा सकाळी घरातून निघताना घातलेल्या शाळेचा गणवेश अद्यापही त्यांच्या अंगावर होता. आरोपींनी दोघा जुळ्या भावंडांना यमुना नदीत फेकून दिले होते. या हत्येने मृत्यच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून २० लाखांची खंडणी घेऊनही आरोपींनी त्यांची हत्या केली.

    उत्तर प्रदेशातील चित्रकूट धाम येथील तेलाचे व्यापारी बृजेश रावत यांच्या पाच वर्षांच्या जुळ्या मुलांचे १२ जानेवारी रोजी अपहरण झाले होते. दुचाकीस्वारांनी मध्य प्रदेशातील सदगुरु सेवा ट्रस्टच्या शाळेतून हे अपहरण केले होते. पोलिसांनी आरोपींकडून खंडणीचे १७.६७ लाख रुपये, दुचाकी आणि कार जप्त केली आहे.

    गुन्ह्यात सहभागी सहा अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पद्म शुक्ला, लकी सिंह तोमर, रोहित द्विवेदी, रामकेश यादव, पिंटू उर्फ पिंटा यादव अशी या आरोपींची नावे आहेत. रामकेश यादव दोन्ही मुलांची शिकवणी घेत असे. पद्म आणि लकी हे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत.अपहरणकर्त्यांच्या गाडीवर भाजपाचा झेंडा असल्याने यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    भुसावळ घरफोडीचा 12 तासांत छडा!

    June 4, 2026

    रेतीच्या हव्यासापायी शहर पुराच्या दाढेत ढकलण्याचा प्रकार

    June 4, 2026

    दिल्ली हॉटेलच्या आगीत संपूर्ण कुटुंब उध्वस्त

    June 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif