देशात कोरोनाचा हाहाकार ! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, मृताचा आकडाही वाढताच

1

नवी दिल्ली : देशात कोरोना नियंत्रणाबाहेर गेला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 2,73,810 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,619 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,50,61,919 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,78,769 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

सोमवारी (19 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2,73,810 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 78 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 19,29,329 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,29,53,821  रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

1 Comment
  1. Rameah Borse says

    ते अमित शहा म्हणतात अजून पूर्ण Lockdown ची परिस्थिती नाही आहे.म्हणजे यांना अजून किती आकडा वाढला पाहिजे म्हणजे परिस्थिती ची जाणीव होईल.फक्त राजकारण चालू आहे

Leave A Reply

Your email address will not be published.