एरंडोल (प्रतिनिधी) : पावसाळा सुरु होण्यापूर्वी एरंडोल तालुक्याची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या अंजनी धरणात ३० टक्के जलसाठा होता.यावर्षी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणात फक्त ८ टक्के पाणीसाठा वाढला आहे.आजच्या घटकेला धरणात एकुण ३८ टक्के साठा आहे.म्हणजे एकुण १८० द.ल.घ.फु.इतका जिवंत जलसाठा आहे. धरणाची पाणीसाठा क्षमता १५.७० द.ल.घ.मी.आहे.धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अजुनही प्रतीक्षा आहे.
अंजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र ११५ चौरस किलमीटरचे असुन अंजनी नदीच्या उगम स्थानापासून जवळपास ३० ते ४० लहान मोठे बंधारे आहेत.आधी त्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होतो.ते पुर्ण भरुन ओव्हर फ्लो झाल्यावर अंजनी धरणात पाण्याची आवक सुरु होते.गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अंजनी धरण पूर्ण भरले होते.


