दलितांवर अत्याचाराच्या घटना राज्यात वाढल्या – नवाब मलिक 

0
ना. गुलाबाबराव पाटलांसह खडसे  , मलिक,चित्रा वाघ आदींनी घेतली पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट 
जळगाव;- राज्यात अलीकडे दलितांवरच्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असून गुटखा व वाळूमाफियांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला . यावेळी माजीमंत्री गुलाबराव देवकर,  राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, गफ्फार मलिक आदी उपस्थित होते .
येथील समता नगर भागातील आठ वर्षीय अक्षरा करोसिया हिच्यावर झालेला अत्याचार व खून प्रकरणात आज राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह माजीमंत्री एकनाथराव खडसे , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक , राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह इतरांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले.
आज दुपारी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी समतानगर भागात भेट घेतली . यावेळी शासनातर्फ़े पीडित मुलीच्या कुटुंबियांना सर्वोतोपरी मदत दिली जाईल असे आश्वासन ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले . यावेळी पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले कि, भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी एका व्यक्तीकडून संरक्षण मिळवायच्या नावाखाली १० लाख रुपये मागितल्याचा व्हिडीओ आपल्याकडे असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी मलिक यांनी केले .  पीडीत मुलीवर अत्याचार झाल्याची घटना अत्यंत वाईट घडली आहे . आदेश बाबाला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरु आहे . दलितांवर अत्याचाराच्या घटना राज्यात घडल्या आहे . पालकमंत्र्यानी वाकडी तथा समतानगर येथील घटनेच्या पार्शवभूमीवर भेट दिली नाही . तसेच गुटखा , वाळूमाफिया यांना फोन करून पोलीस यांना पाठीशी घालण्यात येत आहे असा आरोप प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोप केला . यावेळी पोलिसांच्या भूमिकेवर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले .
Leave A Reply

Your email address will not be published.