दलितांना आत्म संरक्षणासाठी बंदुकीचे परवाने मिळावे : जगन सोनवणे

0

भुसावळ (प्रतिनिधी) : देशभरातील विविध राज्यांमध्ये दलितांवर अत्याचार होत असून जामनेर तालुक्यातील वाकडी व जळगाव येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटना दुदैवी आहे. अशा घटनांना रोखण्यासाठी सरकारने दलितांना आत्मसंरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावे अशी मागणी पिपल्स रिपाईचे नेते तथा माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी केली ते आज दि. 16 रोजी ‘भिमालय’ जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की, जामनेर तालुक्यातील वाकडी येथे मातंग समाजातील मुलांना मारहाण करुन धिंड काढणे व जळगाव येथील 8 वर्षीय मेहतर समाजातील मुलीवर अत्याचार या घटना दुदैवी असून त्या व केळीवर निपाहर विषाणूच्या आफवेमुळे शेतकर्‍यांना नुकसान भरपाईसाठी दि. 18 रोजी शेतकरी व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतर्फे रावेर येथे रेलरोको आंदोलन करण्यात येणार आहे. अत्याचाराच्या घटना दडपण्यासाठी काही नेते प्रयत्न करीत असून ते दडपले जाऊ देणार नाही. सत्ताधार्‍यांच्या राज्यात दलितांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहे. या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी करुन सदर खटले जलदगतीने न्यायालयात वर्ग करावे, पिडीत दलितांना शासनाने प्रत्येकी 25 लाख रु. नुकसान भरपाई द्यावी, पिडीत तरुण व त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी मिळावी, शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागण्यांसाठी रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून दुपारी 1 वाजता इन्साफ मोर्चा काढून काशी एक्सप्रेसवर रेल रोको आंदोलन करणार असल्याचेही जगन सोनवणे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत संतोष मेश्राम, हरिष सुरवाडे, आरीफ शेख, राकेश बग्गन, मौलाना अजीम, राजू डोंगरदिवे, आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी बबलू सिद्दीकी, विशाल बाविस्कर, बरकत अली, संगिता ब्राम्हणे, गजानन चर्‍हाटे, दिपक पाटील, फैजपूरचे नगरसेवक मोहसीन खान, सुनिल पाटील, सुनिल ठाकूर, प्रल्हाद गायकवाड, शेख गफ्फार, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.