मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी आगामी निवडणुकांसोबतच इतरही मुद्यांवर भाष्य केलं आहे. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, नवाब मलिक आणि इतर नेतेही उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेपूर्वी उत्तरप्रदेशातील काँग्रेस अल्पसंख्यांक चेहरा म्हणून ओळख असलेले सिराज मेहंदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तीन राज्यांत निवडणूक लढणार शरद पवारांनी म्हटलं, आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत एकूण तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभाग घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. उत्तरप्रदेशात भाजपचं सरकार हटवण्याची गरज आहे.
उत्तरप्रदेशातील नागरिकांना परिवर्तन होवून बदल हवाय. याकरिता सिराज मेहंदी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. येत्या दिवसात त्यांचे अनेक सहयोगी राष्ट्रवादीत येणार आहेत. असंही शरद पवार म्हणाले. उत्तरप्रदेशात सपा-राष्ट्रवादी आघाडी उत्तरप्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र निवडणूक लढणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच उत्तरप्रदेशात जाणार असल्याचंही यावेळी शरद पवारांनी सांगितलं आहे. तसेच एकत्र बैठकीत जागा वाटप धोरण ठरणार असल्याचं शरद पवार म्हणाले. मणिपूर-गोव्यात काँग्रेससोबत आघाडी मणिपूरमध्ये पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे. मणिपूर राज्यात काँग्रेससोबत बोलणी सुरू आहे.
तसेच गोव्यामध्येही काँग्रेस पक्षासोबत आणि तृणमूल काँग्रेस पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. गोव्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. भाजपचं गोव्यातून सरकार हटवण्याची गरज आहे. येत्या दोन दिवसांत आघाडीचा निर्णय होईल असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. देशातील 5 राज्याच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सुद्धा यावेळी शरद पवार काय भाष्य करतात? कुठल्या राज्यात निवडणूक लढवतात आणि कुठल्या पक्षासोबत आघाडी करतात यासंदर्भात शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर यावर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.