मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : पुरनाड चेकपोस्टवर एकही अनधिकृत पंटर राहणार नाही. असा कुणी पंटर अढळलाच तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वास प्रादेशीक परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी आज दिले. पुरनाड ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आ.चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संबंधीत अधिकार्यांची बैठक झाली. आ.पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे पुरनाड ग्रामस्थांनी आपले आंदोलन रद्द केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुनगाव येथील चेकपोस्टवर शासनाचा अधिकारी जमा होणारा महसूल न घेता अवैध मार्गाने इथे पंटर नेमून पैसा वसूल करतात. या पार्श्वभुमीवर चेकपोस्ट वरील पंटर कायमस्वरुपी बंद करण्यात यावे, कर बुडव्या वाहनधारकांना चपराक बसविण्यात यावी अन्यथा 16 मार्च पासून आंदोलनाचा इशारा पुरनाड ग्रामस्थांनी दिला होता. यासंदर्भात दिनांक 24/02/2020 रोजी निवेदन दिलेले होते. मात्र, या निवेदनाला काही प्रत्यूत्तर न आल्याने पुरनाड ग्रामस्थांतर्फे स्मरण पत्र देण्यात आले. 16 मार्च पासून आंदोलन छेडण्याचा ईशारा या स्मरण पत्रात दिला होता.
या पत्राची दखल घेत आ.चंद्रकांत पाटील यांनी संबंधित परिवहन अधिकार्यांची बैठक घेतली. अनधिकृत पंटर असतील तर हा प्रकार बंद करण्याची सुचना आ.पाटील यांनी अधिकार्यांना दिल्या. प्रादेशिक परिवहन विभागाने याविषयी लेखी आश्वासनच दिले आहे. प्राप्त तक्रारी अन्वये परिवहन विभागाच्या भरारी पथकाद्वारे पुर्नाड नायगाव रसत्यावरील अवैध वाहतुकीस आळा घालण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे. तक्रारी नुसार चेकपोस्टवर कोणताही खाजगी व्यक्ती वसूली करत नाही. असे आढळल्यास अवैध मार्गाने वसूली करणार्या पंटरवर कार्यवाही करण्यात येईल. ही धडक कार्यवाही भविष्यातही सुरु राहील अशा आशयाचे लेखी पत्रच परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे.
लेख आश्वासन मिळाल्यामुळे पुरनाड वासियांकडून समाधान व्यक्त होत आहे. अवैध वाहतूकीमुळे पुरनाड ते नायगाव या शेत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. याचा शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. आ.चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने आम्हाला न्याय मिळण्याचे चिन्ह दिसत असल्याचे पुरनाड परिसरातील शेतकर्यांनी याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी गुलाबराव पाटील, प्रमोद पाटील, भागवत कोळी, मनोज पाटील, अनिल पाटील, पप्पू पाटील, हर्षल पाटील, प्रदीप पाटील, महेश पाटील व ग्रामस्थ ऊपस्थित होते.