जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू ; जिल्हाधिकारी राउत

0

जळगाव : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे आज जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी पत्रकार परिषद म्हणाले आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आला आहे. जिल्ह्यातही अशीच परिस्थिती राहिली तर लॉकडाऊन लावण्यात येईल.  लॉकडाऊन लावण्याचे निश्चित झाल्यास तो अचानक जाहीर न करता २-३ दिवस अगोदर पूर्वसूचना देण्यात येईल अशी माहितीही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढीस लागली असल्याची बाब स्पष्ट आहे. मात्र याच्या प्रतिकारासाठी ग्रामस्थांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात रूग्ण शोध मोहिम सुरू करण्यात आली असून यात ग्रामीण भागातील रूग्णांची तपासणी देखील करण्यात येत असून या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

तर आयुक्त सतीश कुलकर्णी म्हणाले की, जळगाव शहरातील संशयित रूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्याला आमचे प्राधान्य आहे. शहरातील हॉटस्पॉटमध्ये मास टेस्ट चाचणी करण्यात येणार आहे. पिंप्राळा, अयोध्यानगर, गणेश कॉलनी, कांचन नगर आदी भागांमध्ये कांचन नगर आदी भागांमध्ये तपासणीची सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.