जळगाव, –प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2017 मध्ये राज्यात भारतीय कृषि विमा कंपनी लि., नॅशनल इंशुरन्स कंपनी लि., ओरीएंटल इंशुरन्स कंपनी लि., युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लि., रिलायन्स जनरल इंशुरन्स कंपनी लि. या 5 विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात आली. असून जळगाव जिल्हयातील 29 हजार 54 पात्र शेतक-यांना 37 कोटी 25 लक्ष 83 हजाराचा ओरीएंट इंन्शुरन्स कंपनीकडून नुकसान भरपाईचा लाभ मिळाला आहे.
विमा संरक्षण घेतलेल्या राज्यातील सहभागी शेतकऱ्यांपैकी 12.62 लाख पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी रु. 747.28 कोटी रक्कमेचे वाटप D.B.T. प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. तसेच 21.35 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई रक्कम जमा करणेस्तव रु.1135.40 कोटी नुकसान भरपाई रक्कम संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकुण रक्कम रु 1882.68 कोटी नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे.
बँक निहाय वितरीत करण्यात आलेल्या निधीचा त्याचप्रमाणे लि., ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड., नुकसान भरपाईचा शेतकरी निहाय तपशिल कृषि विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. संबंधित बॅंकामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर सात दिवसाच्या आत नुकसान भरपाई जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.