जळगाव ;- जळगाव शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह तर काही ठिकाणी गार पडून पावसाचे जिल्ह्यात दमदार आगमन झाले आहे . यामुळे बळीराजा सुखावला आहे . तसेच नागरिकांना कडाक्याच्या उकाड्यापासून काही अंशी सुटका होऊन आल्हाददायक गारवा मिळून चांगलाच दिलासा मिळाला आहे .
जळगाव शहरात सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास थंडगार व सोसाट्याचा वारा वाहून साडेआठ वाजेच्या सुमारास पावसाळा सुरुवात झाली . तर अचानकपणे आलेल्या पावसामुळे अनेकांची त्रेधा तिरपीट उडाली- . मात्र एकाद्यापासून दिलासा मिळत गारवा निर्माण झाला होता.
———-पाचोऱ्यात गारांसह जोरदार पावसाचे आगमन———
पाचोरा शहरासह तालुक्याच्या बहुतांशी गावात पावसाचे प्रथमच आगमन झाले, मोंढाळे परीसरात सुमारे अर्धा तास बोरांच्या साइजच्या गारा पडल्या,तर खडकदेवळा परीसरात सुसाट्याचे वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली व अनेक घरांचे पत्रे उडाली, खेडगाव नंदिचे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे हायवेवर विजवितरण कंपनीच्या तारा लोंबकळत असल्याचे जळगाव येथून येत असतांना उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने विजवितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सपकाळे यांना भ्रमणध्वनी द्वारे माहिती दिल्याने सपकाळे यांनी तातडीने कर्मचाऱ्यांची टिम पाठवून तारा ओढून घेतल्या, शहरात प्रथमच पाऊस झाल्याने हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी आनंद लुटला
दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे .
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post