जळगाव : मालवाहू रिक्षातून विटा घेवून जात असताना रिक्षाचे ब्रेक फेल झाले. यात वेगावर नियंत्रण मिळविता न आल्याने घरावर जावून आदळली. यात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी शहरातील समता नगरातील जिजाऊमाता चौकात घडली.
शहरात वास्तव्यास असलेल्या राहणाऱ्या युवराज उर्फ भगवान गोविंदा बाविस्कर (वय ३२) असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. युवराज बाविस्कर हा मागील सहा महिन्यांपासून जळगावात पत्नी व दोन मुलांसह मालवाहू वास्तव्यास आहे. माल वाहतूक रिक्षा चालवून घर चालवत होता. यात त्याला आज सकाळी किरकोळ कामासाठी मालवाहू (एमएच १९ एस ७१४२) रिक्षा घेवून गेले.
मालवाहू रिक्षात विटा भरून समतानगरकडे जात असताना जिजाऊमाता चौकातील उतारावर आल्यानंतर येथे ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असता, त्यावेळी मालवाहतूक रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे युवराज बाविस्कर यांचा रिक्षावरील ताबा सुटला आणि थेट समोरच्या घराला धडक दिली. यात रिक्षा घराला धडकल्याने युवराज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली; त्यातच त्याचा जागीत मृत्यू झाला. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.