जळगावात आजाराला कंटाळून प्रौढाची आत्महत्या

0

जळगाव प्रतिनिधी । आजाराला कंटाळून एका ५२ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना वाघनगर परिसरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीत घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनुराग स्टेट बँक कॉलनी येथील रहिवाशी असलेले दशरथ महादू राठोड (५२) हे त्यांच्या कुटूंबियांसह वास्तव्यास होते. मजुरी करून ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते सतत आजारी राहत होते. याला कंटाळून त्यांनी अत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यातच मंगळवारी कुटूंबीय कामाला गेल्यामुळे दशरत राठाडे घरात एकटेच होते. त्यात त्यांनी घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. हा प्रकार त्याचा लहान मुलगा घरी आला तेव्हा प्रकार लक्षात आला. परिसरातील नागरिकांनी पोलिसांनी माहिती दिल्यानंतर रामांनदनगर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्यानंतर राठोड यांना जिल्हा रूग्णालयात नेण्‍यात आले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती राठोड यांना मृत घोषित केले.

दशरथ राठोड यांच्या पश्चात पत्नी निर्मला तीन मुले सुनील, अनिल आणि योगेश असा परिवार आहे. पूर्ण परिवार मजुरी करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. या घटनेची रामानंद नगर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.