शेतकऱ्यांसह व्यापारी,नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
जळगाव ;– गेल्या काही दिवसांपासून हूल दिलेल्या पावसाने आज जळगाव शहरात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जोरदार हजेरी लावली . तसेच जिल्ह्यातही पाऊस दमदार कोसळत आहे . यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी,नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे .
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता . परंतु जळगावात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता . पावसामुळे बाजारपेठेत विक्रेत्यांची धावपळ उडाल्याचे चित्र दिसत होते . तसेच सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली .