नगराध्यक्षसह न.पा.प्रशासनाचे दुर्लक्ष !; अन्यथा आंदोलन
चोपडा (प्रतिनिधी)- येथील आठवडे बाजार भाजीपाला मार्केट मध्ये घाणीचे साम्राज्य असून या विषयी वेळोवेळी नगराध्यक्षा सौ.मनीषा जीवन चौधरी व नगरपालिका प्रशासनास लेखी तसेच मौखिक स्वरूपात तक्रार करून ही याकडे संबंधितांचे दूर्लक्ष होत असल्याचे तक्रार भाजीपाला विक्रेते प्रतिभा माळी यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,न.पा.प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून आझाद चौक विभागात भाजीपाला विक्रेत्यांसाठी दुकाने बांधून दिली आहेत त्यात महिला व पुरुष शौचालय देखील आहेत मात्र त्याठिकाणी पाण्याचा अभाव असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.पावसाळ्यात पाणीचे नियोजन करण्यात आले नसून सदरील पाणी भाजीपाला मार्केट मध्ये साचते म्हणून बाजारात पूर्णपणे दुर्गंधी युक्त वातावरण आहे यामुळे मोठ्या प्रमाणात आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वेळीच नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्षा यांनी तात्काळ पावसाळ्याचे पाणीचे व सापसफाईचे काम हातात घ्यावे अशी मागणी जोर धरत आहे.अन्यथा भाजीपाला विक्रेत्याकडून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी माहिती विक्रेता प्रतिभा माळी यांनी दिली.