जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात रोज अकराशे व बाराशे रुग्ण आढळून येत असताना आज जिल्ह्यात पहिल्यांदा हजाराच्या आत रूग्ण आढळून आले आहे. आज १ हजार १९५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आज ९८४ नवे रुग्ण आढळून आले आहे. मात्र जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेला कोरोना मृताच आकडा वाढतच आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे, आज विक्रमी २१ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर-२११, जळगाव ग्रामीण -७५, भुसावळ-७८, अमळनेर-३७, चोपडा-१२, पाचोरा-१७, भडगाव-३४, धरणगाव-४६, यावल-६७, एरंडोल-७३, जामनेर-२०, रावेर-८६, पारोळा-६, चाळीसगाव-५९, मुक्ताईनगर-१५८, बोदवड-० आणि इतर -५ एकुण ९८४ बाधित आढळूले आहे.
जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात एकुण १ लाख ५ हजार ३६ रूग्ण संख्या झाली आहे. त्यापैकी ९१ हजार ६९९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार ५८९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जिल्ह्यात पहिल्यांदा २१ रूग्णांचा मृत्यू झाल्याचा उच्चांक गाठला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकातून कळविले आहे.