मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशासह महाराष्ट्रातीस जनजीवनावर परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित करुन खबरदारीचं आवाहन केलं. लोकांनी घराबाहेर पडू नये, लोकल, बसची गर्दी ओसरली. आपण जागतिक युद्ध लढत आहोत. घाबरु नका, घाबरून युद्ध जिंकलं जात नाही, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले.हे ‘वॉर अगेन्स व्हायरस’ आहे. आपण खबरदारी घेत आहात, पण आणखी खबरदारी घ्यायला हवं असं मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, त्याला नागरिकांची साथ देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना त्यांचं स्पिरीट दाखवण्याची वेळ आता आली आहे.हा विषाणू हळूहळू पावलं पुढे टाकत आहे. आपण त्याला थोपवत आहोत. आपल्याकडचे रुग्ण सर्वजण बाहेरुन आलेले आहेत. अनवाश्यक असेल तर घरातून अजिबात बाहेर पडू नका, बस, रेल्वेमधील गर्दी आणखी कमी करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.