Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»ग्रीन झोनमध्ये देशांतर्गत विमानवाहतूक सुरु होणार
    ताज्या बातम्या

    ग्रीन झोनमध्ये देशांतर्गत विमानवाहतूक सुरु होणार

    By May 10, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली: लॉकडाऊननंतर देशांतर्गत विमान वाहतूक ज्यावेळी उड्डाणाचे आणि उतरण्याचे ठिकाण असलेली दोन्ही शहरे ग्रीन झोनमध्ये वर्ग केलेली असतील, तेव्हाच सुरू केली जाईल, असे केंद्रीय विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्ट केले आहे.

    करोनाचा संसर्ग कमी जास्त होत असल्याने अनेक शहरांचे झोनमध्ये करण्यात आलेले वर्गीकरणही सतत बदलत असल्याने देशांतर्गत विमान वाहतूक सुरू करणे हे मोठे आव्हानात्मक काम असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 17 मेनंतर लॉकडाऊन उठल्यानंतर देशातील व्यापारी विमान वाहतूक सुरू करण्याबाबत विमान मंत्रालयाने विविध कंपन्यांसोबत बोलणी सुरू केली आहे. परंतु हे टप्प्याटप्प्यानेच केले जाईल. सुरुवातीला देशांतर्गत विमान वाहतूक सुरू केली जाईल. पुढच्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू करण्याचा विचार केला जाईल, असे पुरी म्हणाले.

    विमान मंत्रालयाने विदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाची 64 विमाने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात जवळपास 1.2 लाख भारतीयांना परत आणले जाणार आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी बचाव मोहीम असणार आहे. जगभरात साथ सुरू असल्यामुळे सर्वच देशांतील विमान वाहतूक ठप्प आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही बंद असून, ती सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार

    June 9, 2026

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif