Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»गॅस दरवाढीवरून विरोधकांचे मोदी सरकारवर टीकास्त्र
    राष्ट्रीय

    गॅस दरवाढीवरून विरोधकांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

    By February 13, 2020No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरून विरोधी पक्षांनी मोदी सरकार आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. दिल्लीतील भाजपच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी दरवाढीचे पाऊल उचलण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

    नव्या दरवाढीमुळे गॅस सिलिंडर वर्षभरात तब्बल 200 रूपयांनी महागला आहे. सरकारने जनतेच्या खिशालाच करंट दिला आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी ट्‌विटरवरून दिली.

    भाजप हा जनहितविरोधी पक्ष आहे. त्या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या निर्णयांमध्ये आणि धोरणांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटत असते. अनेक विधानसभा निवडणुकांत पराभव होऊनही त्या पक्षाने त्यातून धडा घेतलेला नाही, असे तृणमूल कॉंग्रेसने म्हटले. माकपने मोदी सरकारवर टीका करताना भाजपच्या दिल्लीतील पराभवाचा संदर्भ दिला.

    दिल्लीतील जनतेने भाजपला अनुकूल मतदान केले नाही. त्याची शिक्षा म्हणून गॅस दरवाढ करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया माकपकडून देण्यात आली. तीव्र महागाईमुळे गरीब आणि सामान्य जनता आधीपासूनच त्रस्त आहे. आता गॅस दरवाढीसारख्या निष्ठूर निर्णयाचा फटका कोट्यवधी जनतेला बसेल, अशा शब्दांत बसपच्या प्रमुख मायावती यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    दिल्ली हॉटेलच्या आगीत संपूर्ण कुटुंब उध्वस्त

    June 4, 2026

    ठरले! ‘या’ तारखेला कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन

    June 4, 2026

    राजधानी दिल्ली हादरली : हॉटेलमध्ये मृत्यूचे तांडव!

    June 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif