गिरणा धरणातून १ हजार ५०० क्युसेक्स पाणी सोडले

0

चाळीसगाव ,पाचोरा – भडगाव शहराचा पाण्याचा प्रश्न सुटणार
पाचोरा / भडगाव : गिरणा धरणातून पिण्यासाठी १ हजार ५०० क्युसेक्स पाणी सोडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली . सध्या जाणवत असलेल्या तीव्र उन्हाच्या झळांनी भूजल पातळी खालावली होती . तसेच अनेक गावांना पिण्याचा प्रश्न जाणवत असल्याने आवर्तन सोडण्याची मागणी होत होती . त्यानुसार आज शनिवार रोजी गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले . यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे .

आवर्तनामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असलेल्या गावांना दिलासा मिळाला असून त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही दिवस सुटला आहे. आवर्तनामुळे गिरणेवरील बंधाऱ्यांना पाणी आले असून, विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ होणार आहे. धरणातून दीड हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. गिरणा धरणाच्या पाण्यावर चाळीसगाव, भडगाव व पाचोऱ्यासह जिल्ह्यातील पाच नगरपाल‌िका आणि १५७ गावे अवलंबून आहेत. गिरणातून आवर्तनाची मागणी काही दिवसांपासून होत होती. स्तरांतून दबाव वाढल्यामुळे प्रशासनाला गिरणा धरणातून आवर्तन सोडवे लागले.

Leave A Reply

Your email address will not be published.