नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ चार टक्क्यांची वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, या महागाई भत्तावाढीमुळे सरकारी तिजोरीवर कोट्यवधींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
यापूर्वी ऑक्टोबर २०१९ मध्ये सरकारनं महागाई भत्त्यात वाढ केली होती. केंद्रानं त्यावेळी महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली होती. या निर्णयामुळे ५० लाख वेतनधारक कर्मचारी आणि ६२ पेन्शनधारकाना लाभ झाला. तर तब्बल १६ हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडला होता. चार टक्के वाढ करण्यात आल्यामुळे भत्ता २१ टक्के झाला आहे.