खामगाव -प्रतिनिधी- शहरातील काही प्रभागात गेल्या ३-४ दिवसांपासून पथदिवे बंद असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र याबाबत लोकप्रतिनिधींना काही सोयरसुतक नाही तर सेवानिवत्त्तीच्या उंबर’यावर असलेले मुख़्याधिकारी ‘ठेकेदारांच्या मोहपाशात अडकले असून माया जमा करण़्यात व्यस्त असल्याचा आरोप होत आहे.
शहरातील अनेक भागात स्वच्छतेचा बोजवारा वाजत आहे. रस्ता कामात भ्रष्ष्टाचार वाढला आहे, बांधकाम विभाग तर ठेकेदारांच्या भरवशावर चालत आहे, अशा प्रकारचे आरोप होत आहेत. मात्र तुंबडी भरणारे लोकप्रतिनिधी व प्रशासन अधिकारी यांना याबाबत काही घेणे देणे नाही, पण जनतेला याबाबतीत अंधारात ठेवणारे न. प. प्रशासन रात्रीही पथ्दिवे बंद ठेवून जनतेला अंधारात ठेवत आहे. याबाबत कानोसा घेतला असता ज्या भागात अवैध धंदे सुरु आहेत, त्याच भागातील पथदिवे बंद असल्याचे समजते. यामध़्ये विशेष करुन घाटपुरी नाका भागाचा समावेश असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे न.प.च्या दिव्याखालीच अंधार असल्याने शहराच्या विकासाचे वाटोळे होणार नाही कसे, असा सवालही शहरवासी उपस्थित करीत आहेत.