मुंबई : भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ११ नवीन रुग्ण आढळून आल्याची बाबसमोर आली आहे. शुक्रवारी कोरोना बाधितांची संख्या ५२ होती. आज २१ मार्च रोजी ती ६३ वर पोहोचली आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी कडकं पावलं उचलली आहे. मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी दिली.