कोरोनाचा सर्वत्र कहर त्यात गारपीटीची भर ‌

0

एरंडोल:- एरंडोल शहरासह जिल्ह्यात सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या अधिकाधिक मोठी होत असून कोरोना आटोक्यात येईल असे कोठेही शक्यता दिसून येत नाही. अशा चिंताजनक स्थितीत शनिवारी संध्याकाळी एरंडोल तालुक्यात कासोदा आडगाव परिसरात तसेच भातखेडे ताडे , पिंपरी सिम, निपाने बामणे, जवखेडे सिम या परिसरात वादळी वाऱ्यासह हरभऱ्याच्या आकारा एवढी गारपीट झाली त्यामुळे ऐन काढणीच्या   वेळी असलेली शेतातील हरभरा ,मका, गहू, ज्वारी, बाजरी, व इतर पिके आडवी पडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. अवकाळी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे व्हावे अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.  ‌ आधीच कोरोना ने केला सर्वत्र कहर, अन् त्यात पडली आता गारपीटीची भर अशी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

एरंडोल तालुक्यात हाता तोंडाशी आलेला घासावर अवकाळी चे पाणी फिरले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा हतबल झाला आहे.

जवळपास वर्षभरापासून कोरोना थांबून थांबून आपले बाहुपाश घट्ट करीत आहे ‌ कोरोनाच्या महामारी मुळे सर्वच क्षेत्रांना प्रचंड फटका बसला आहे. अजूनही कोरोना आटोक्यात येण्याचे चिन्ह दिसत नाही.

एरंडोल तालुक्यात रविवारी एरंडोल शहर ५८ व ग्रामीण ४८ असे एकूण शतकी सलामी कोरोना ने आज दिले आहे. तर आतापर्यंत कोरोना ने ७४ बळी घेतले आहेत. ॲक्टिव कैसे ची संख्या ५४४ आहे. ही आकडेवारी व रब्बी पिकांची अवकाळी मुळे झालेले नुकसान ‌ पहाता. निसर्ग कोपला आहे की काय अशी शंका सर्वसामान्यांना त्रस्त करीत आहे. या दुहेरी अस्मानी संकटात शेतकरी व नागरिक अडकल्यामुळे जीवन कसे जगावे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.