खामगांव(प्रतिनिधी) केंद्रातील मोदी सरकारने लागु केलेले तीन काळे कृशी कायदे रदद् करावे या मागणीसाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी 26 मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकरी संघटनांच्या बंदला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाच्या वतीने २६ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत राज्यभर, जिल्हा व तालुका मुख्यालयी ठिकाणी उपोशण करण्यात येणार आहे.खामगांवात माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली टाॅवर चैकातील राजीव गांधी उद्यान येथील जयस्तंभ समोर काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपोशणाला बसणार आहे.
केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी व शेती उद्धवस्त होणार आहे. मोदी सरकार शेतकर्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधत आहे. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. या महागाईने सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहेच परंतु नोकरदार व मध्यमवर्गीयांचेही कंबरडे मोडले आहे. दिल्लीच्या सीमेवर देषभरातील शेतकरी मागील 117 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाला बसले आहेत. देशात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली असताना मोदी सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. या झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंदची हाक दिली असून या भारत बंदला काँग्रेस पक्षाने सक्रीय पाठिंबा देत राज्यभर उपोषण करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
त्यानुसार शुक्रवार दि.26 मार्च 2021 रोजी खामगांव मतदार संघातील शेतकरी व काॅंग्रेसजणांच्या वतीने उपोशण करण्यात येणार आहे. तरी भारत बंद आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी या उपोशणामध्ये काॅंग्रेसच्या विविध संघटना,सेलचे पदाधिकारी,आजी-माजी जि.प., पं.स.सदस्य, आजी-माजी नगरसेवक,शेतकरी बांधवांसह काॅंग्रेस कार्यकत्यानी मोठया संख्येने कोरोनाच्या पाष्र्वभुमीवर सोशल डिस्टसिंग ठेउन व तोंडाला मास्क लावुन केंद्र सरकार व प्रशासनाला जागे करण्यासाठी उपोशण कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन खामगांव तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॅ.सदानंद धनोकार व शेगांव तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले व काॅंग्रेसच्या विविध संघटना सेलच्या वतीने करण्यात आले आहे.