Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कापूस पीक विमा लवकर मिळावा ; शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
    जळगाव

    कापूस पीक विमा लवकर मिळावा ; शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

    By May 7, 2020No Comments26 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा (प्रतिनिधी) : शेतकरी खरीप हंगामात अतिवृष्टी व अवकाळी पावसाने हैराण झाला होता व तो आज चहुबाजूंनी अडचणीच्या गर्तेत सापडला आहे. पारोळा तालुक्यातील 2019 20 चा खरीप हंगामातील कापूस पीक विम्याची रक्कम विमा कंपनीकडून त्वरित मिळावी व ती रक्कम शेतकऱ्यांच्या पिक कर्ज खात्यात न जमा करता शेतकऱ्यांच्या नावे बचत खात्यात जमा करावी असे आशयाचे निवेदन शेतकरी संघटना पारोळा च्या वतीने तहसीलदार श्री गवांदे यांना देऊन माहितीस्तव कृषी अधिकारी पारोळा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव जिल्हाधिकारी जळगाव कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.

    पारोळा तालुक्यातील खरीप 2019 20 कापूस उत्पादक पिक विमा पोटी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता अतिवृष्टी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे खूप प्रमाणात नुकसान झाले होते तसेच शासनाच्या निर्दशनास आले होते तशा सूचना विमा कंपनीत दिल्या गेल्या होत्या कृषी विभाग कडून पीक पंचनामे झाले होते परंतु अद्याप पावेतो शेतकऱ्यांना कापूस पीक विमा मिळालेला नाही कापूस पीक विमा लवकर मिळावा असे शेतकऱ्यांकडून भावना व्यक्त होत आहेत.

    पारोळा तालुक्यात 12290 शेतकऱ्यांनी पीक विमा सहभाग नोंदवला आहे तर एकूण 13789 हेक्टर क्षेत्रावर पिक विमा घेतला होता. या पिक विमा पोटी शेतकरी हिस्सा 24820875 एवढी रक्कम भरलेली आहे पीक विम्याची संरक्षित रक्कम 496417500 रुपये एवढी आहे अतिवृष्टीने तालुक्यातील खरीप हंगाम संपूर्णपणे वाया गेला होता. 31 मार्च पर्यंत पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावयास हवी होती असे या निवेदनात म्हटले आहे यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील संघटनेचे प्रवक्ते प्रा भिकनराव पाटील उपस्थित होते.

    जळगाव जिल्हा विमा प्रतिनिधी शी फोनवर संपर्क केले असता मुंबईचे विमा कंपनीचे कार्यालय बंद असल्याचे सांगण्यात आले आहे व तेथील संपर्क नंबर मागितला असता कार्यालय बंद असल्याची बतावणी केली गेली.
    -किशोर पाटील
    तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना, पाऱोळा

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif